31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र'त्या' आमदारांच्या जीवाला धोका

‘त्या’ आमदारांच्या जीवाला धोका

टीम लय भारी

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे हे षडयंत्र आहे. हे ऑपरेशन लोटस आहे. भारतीय जनता पक्षाने आमदारांचे अपहरण केले. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार केल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. अपहरण झालेल्या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचे संजय राउत यांनी यावेळी सांगितले. या आमदारांवर खूनी हल्ले केले. ते दहशतीमध्ये आहेत. तसेच काही आमदारांना बाहेर पडायचे आहे असा निरोप आल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार आणखी अडीच वर्षे चालेल. आम्हाला पोट निवडणूका नको असे अनेक आमदारांचे मत आहे. देशभरातील प्रमुख नेत्यांनी या विषयावर शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. सात स्तरांची पोलीस सुरक्षा एकनाथ शिंदे ठेवलेल्या हाॅटेलला आल्याने प्रवेश मिळणे अवघड झाले. गुजरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने या नाराजी नात्याची चर्चा देशभर रंगली.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला एक प्रस्तावाला दिला. मात्र प्रस्तावाला पक्षात स्थान नाही. असे संजय राऊत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व आम्हाला बालपणीच मिळाले. राजस्थान आणि मध्यप्रदेशप्रमाणे ऑपरेशन लोटस येथे होऊ देणार नाही.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

शरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी